हॉटेलमध्ये आणि रस्त्यावरच्या खाऊगल्ल्यांमध्ये खाण्याचे मुंबईकरांचे प्रमाण वाढले आहे. याठिकाणी स्वच्छतेचे निकष अनेकदा पाळले जात नाहीत. अन्नसुरक्षेचे निकष पूर्ण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी अन्न सुरक्षा दिवसानिमित्त काही योजनांची घोषणा केली. राज्यातील चार प्रसिद्ध खाऊगल्ल्यांना अन्न व औषध विभागाचे अधिकारी भेट देऊन अन्न व स्वच्छता सुरक्षेचे निकष पूर्ण करुन या ठिकाणांना उत्तम दर्जाची खाण्यायोग्य ठिकाणांचा दर्जा देण्यात येणार आहेत. देशात पहिल्यांदा या पद्धतीचा प्रयोग राज्यात राबवला जाणार आहे.


No comments:
Post a Comment