रात्री बारा वाजता वाढदिवस साजरा करताना फटक्यांची आतिषबाजी करण्याचे फॅड वाढीस लागले आहे. तसेच दुचाकीच्या पुंगळी करून जोरजोरात आवाज काढत वाहने चालवण्याची संस्कृती रूजू होत असल्याने सामाजिक स्वास्थ बिघडत आहे. घरामध्ये लहान बाळ, जेष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, हदयरुग्ण यांना ध्वनी प्रदुषणाचा प्रचंड त्रास होतो. अशा हिडिस प्रकारे वाढदिवस साजरा करून स्वतःच्या विकृत मानसिकतेचे प्रदर्शन करणा-यांवर स्थानिक पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
No comments:
Post a Comment