मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पावसाळी कामे, नालेसफाई, रस्त्यावर पाणी साठण्याचे प्रकार, राडारोडा, तुंबलेली गटारे, धोकादायक झाडे आदी कामे अपूर्ण राहिल्यास तसेच ही कामे अपूर्ण असतानाही ठेकेदारांची बिले अदा करण्यात आल्यास त्यास महापालिका सहायक आयुक्तांना (क्षेत्रीय कार्यालये) जबाबदार धरण्यात येणार असल्याची तंबी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिली आहे. पावसाळापूर्व कामे अपूर्ण असल्याच्या तक्रारी वाढत असून त्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
No comments:
Post a Comment