पुणे - ‘‘प्रभागांमधील लोकांना पुरेसे पाणी मिळत नाही, महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसह अनेक छोटे प्रकल्पही रखडले आहेत, एकाच कामासाठी अधिकाऱ्यांच्या दालनात फेऱ्या मारण्याची वेळ आली आहे, लोकांना काय उत्तरे द्यायची?’’ ही गाऱ्हाणी विरोधी पक्षीय नव्हे, तर महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांची आहेत. आज या तक्रारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच कानावर घालण्यात आल्या. एक-दोन नव्हे तर भाजपच्या सर्वच नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे कामकाजाबाबत नाराजीचा सूर आळवला आहे. सत्ताधाऱ्यांनीच मुख्यमंत्र्यांकडे नाराजी मांडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
No comments:
Post a Comment