पुणे - मंगळवार पेठेतील होर्डिंग दुर्घटनेला दोन महिने होऊनही दोषींवर कारवाईच काय, पण साधी चौकशीही मध्य रेल्वेकडून गांभीर्याने केली जात नसल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांची सुटका झाली. मात्र, त्यांची खात्यांतर्गत सुरू असलेली चौकशीच गुंडाळली जात असल्याचे रेल्वेच्या कारभारावरून दिसून आले आहे. या घटनेत चार जणांचा जीव गेल्यानंतरही रेल्वेच्या पुणे विभागाची बेफिकिरी उघड होताच प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असे थातूरमातूर उत्तर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने दिले.
No comments:
Post a Comment