Saturday, June 30, 2018

‘व्हेजमार्ट’मधून सेंद्रिय मालाला डिजिटल बाजारपेठ

प्रश्‍न - ‘व्हेजमार्ट’ स्टार्टअपची संकल्पना कशी सुचली? याची वैशिष्ट्ये काय?
अशोक पाटील - मला काही वर्षांपूर्वी घशाच्या कर्करोगाचे निदान झाले. शरीरावर घातक परिणाम करणारी रासायनिक खते, कीटकनाशके कर्करोगाला कारणीभूत असल्याचे समजले. त्यानंतर औषधोपचाराने मी कर्करोगावर मात केली. मात्र शेणखत, कंपोस्ट खतांवर शेती करण्यात यापुढील आयुष्य घालवायचे, असे ठरविले. त्यानंतर २०१५मध्ये ‘व्हेजमार्ट’ हे संकेतस्थळ आणि ॲपच्या माध्यमातून पश्‍चिम महाराष्ट्रातील सेंद्रिय शेती करणाऱ्या पाचशे शेतकऱ्यांना एकत्र करून पालेभाज्या, फळभाज्या, मसाले, दूध आदींच्या विक्रीसाठी डिजिटल बाजारपेठ उपलब्ध केली. एक किलो ते पाचशे किलोपर्यंतचा शेतातील माल थेट ग्राहकांच्या दारापर्यंत पोचविणे हे आमचे वैशिष्ट्य आहे.

No comments:

Post a Comment