Saturday, June 30, 2018

टाटांच्या धरणातील पाणी सिंचनासाठी वापरणार

'पीएमआरडीए' आयुक्त किरण गित्ते यांची माहिती

'मुंबईसारख्या शहराची ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी अनेक नवे स्रोत निर्माण झाले असल्याने टाटाच्या पाचही धरणांतील पाण्याचा वापर भविष्यात पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी करावा लागेल,' अशी शक्यता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त किरण गित्ते यांनी शुक्रवारी वर्तवली. गित्ते यांच्या वक्तव्यामुळे भविष्यकालीन नियोजनामध्ये टाटाच्या धरणांतील पाणी पिण्यासह शेतीसाठी उपयोगात आणण्याच्या दृष्टीने सरकारकडून प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment