पुणे - आरोयसेवा सक्षम करण्याकरिता कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतर येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयाचा योग्य वापर होत नसल्याचे कारण देत त्याच्या खासगीकरणाचा हट्ट शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी धरला आहे. या रुग्णालयातील रुग्णसेवा ‘अत्यवस्थ’ असल्याचा शोध या नगरसेवकांनी लावला असून, त्यावर खासगीकरणाचा इलाजही त्यांनीच शोधलाय. या बाबतचा प्रस्ताव मांडून तो बिनबोभाट मंजूर करून घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.
No comments:
Post a Comment