राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला बुधवारपासून (४ जुलै) प्रारंभ होणार आहे. वाहतुकीचे सक्षमीकरण, घनकचरा व्यवस्थापन, किमान शहरी नागरी सुविधा, पिण्याच्या पाण्याचा वाढीव कोटा, बीडीपीबाबतची स्पष्ट भूमिका असे विविध प्रश्न या अधिवेशनात मार्गी लागावेत, ही पुणेकरांची अपेक्षा आहे. पुण्याचे आठ आमदार विधानसभेत आहेत. त्यामुळे शहराचे राज्य शासनाशी संबंधित प्रश्न भाजपकडून कसे सोडविले जाणार, हे पाहावे लागेल.
No comments:
Post a Comment