दांडेकर पूल येथे कालवा फुटल्याने मोठ्या प्रमाणावर घरांचे नुकसान झाले असून त्या ठिकाणच्या लोकांचे आर्थिक नुकसान देखील झाले आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून तीन कोटीची मदत दिली जाणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, तेथील नागरिकांना एक महिन्याचे रेशन दिले जाणार आहे. घटनास्थळाचे पंचनामे झाले आहेत. त्यानुसार त्यांना मदत केली जाणार आहे. महापालिकेकडून प्रत्येक कुटुंबाला अकरा हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, तेथील नागरिकांना एक महिन्याचे रेशन दिले जाणार आहे. घटनास्थळाचे पंचनामे झाले आहेत. त्यानुसार त्यांना मदत केली जाणार आहे. महापालिकेकडून प्रत्येक कुटुंबाला अकरा हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment