राज्यात सर्वाधिक वाहनसंख्या असलेल्या पुणे शहरातील एकमेव परिवहन कार्यालयाकडे मुळातच ३० टक्के मनुष्यबळ कमी असल्याने कामकाजावर मोठा ताण असतानाच १३ अधिकाऱ्यांच्या निलंबनाने ‘दुष्काळात तेरावा’ अशीच स्थिती झाली आहे. अधिकाऱ्यांची संख्या पुरेशी नसल्याने वाहन तपासणीसह नोंदणी आणि वाहन परवान्याच्या दैनंदिन कामावर मोठा परिणाम झाला आहे. शासनाकडून पुरेशे मनुष्यबळ उपलब्ध न झाल्यास त्याचा फटका थेट नागरिकांना बसणार आहे.
No comments:
Post a Comment