Saturday, October 27, 2018

नागरिकांच्या माथी रखडपट्टीच!

राज्यातील कोणत्याही प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) तुलनेत पुणे कार्यालयातून सर्वाधिक महसूल मिळत असतानाही नागरिकांच्या समस्यांबाबत राज्याच्या परिवहन विभागाला काहीही देणे-घेणे नसल्याची सद्यस्थिती आहे. अद्यापही पुणे आरटीओमध्ये पुरेसे मनुष्यबळ देण्यात न आल्याने नागरिकांच्या माथी सर्वच कामांसाठी रखडपट्टीच आहे. दसऱ्यात नव्याने घेतलेल्या वाहनांच्या नोंदणीची प्रमाणपत्रांसाठीही आता प्रतीक्षा करावी लागते आहे.

No comments:

Post a Comment