औंध-बाणेर, बालेवाडी परिसरातील प्रवाशांना त्यांच्या घर-नोकरीच्या ठिकाणाहून बसथांब्यापर्यंत आणि बसथांब्यापासून घर-नोकरीच्या ठिकाणापर्यंत सहज ये-जा करता यावी यासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (पीएससीडीसी) प्रस्तावित ई-रिक्षाच्या प्रकल्पाला पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) अद्याप मान्यता दिलेली नाही. पुणे स्मार्ट सिटी कंपनीने तीन महिन्यांपूर्वीच हा प्रस्ताव पीएमपीच्या संचालक मंडळासमोर सादर केला आहे; पण त्यावर निर्णय घेण्यासाठी मुहूर्त मिळत नसल्याने औंध-बाणेरमध्ये या रिक्षा अद्याप धावू शकलेल्या नाहीत.
No comments:
Post a Comment