एकेकाळी पुणे शहरापासून १५ ते १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंढवा, खराडी या गावांचा गेल्या काही वर्षांत चेहरामोहरा बदलून गेला आहे. खराडी, मगरपट्टा भागात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. उंच इमारतींमुळे मुंढवा आणि खराडी गावठाण काँक्रीटच्या जंगलात हरवून गेले आहे. मुंढव्यातून खराडी बाहय़वळण मार्गावर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाहतूककोंडी होत असल्याने अनेकांनी मुंढवा गावठाणातील छोटय़ा रस्त्याचा वापर सुरू केला होता. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट वाहनचालकांना धमकावणारा फलक लावला. ‘लोकसत्ता’ने हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने हा फलक हटवला.
No comments:
Post a Comment