पुणे : लष्कर परिसरातील जुने वाडे असून यातील अनेक वाडे मोडकळीस आले आहेत. जुन्या वाड्यांपैकी सुमारे 100हून अधिक वाडे हे धोकादायक स्थितीत आहेत. विशेष म्हणजे, अशा वाड्यांमध्ये नागरिकांचे वास्तव्य आहे. मात्र, वाड्यांच्या नूतनीकरणाबाबतची किचकट परवानगी प्रक्रिया, मालकी हक्काबाबत साशंकता, मालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद अशा विविध कारणांमुळे या वाड्यांबाबत कारवाईत अडसर निर्माण होत आहे. परिणामी, या वाड्यांची स्थिती अत्यंत धोकादायक बनली असून याबाबत नेमके करायचे काय? असा प्रश्न कॅन्टोन्मेंट बोर्डासमोर निर्माण झाला आहे.
No comments:
Post a Comment