पुणे - महापालिकेत आता रेव्हेन्यू कमिटी स्थापन केली जाणार आहे. पुढील आठवड्यात या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळेल. राज्य सरकारने यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी दोन वर्षांनंतर केली जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था आर्थिकदृष्ट्या अधिक स्वावलंबी करणे, त्यांना अधिक महसूल मिळावा, उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार करणे आदी उद्देशांची पूर्तता करण्यासाठी राज्य सरकारने महापालिकांनी रेव्हेन्यू कमिटी स्थापन करावी असा निर्णय घेतला. यासंदर्भात महापालिका अधिनियमातदेखील बदल केले गेले आहेत.
No comments:
Post a Comment