मुंढवा - येथील नागरिक कमी दाबाने व अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झाले असून, केवळ पाणीपुरवठा सुरळीत होईल असे आश्वासनच त्यांच्या पदरी पडत आहे. ऐनदिवाळीच्या तोंडावरही पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या भागात पूर्ण दाबाने पाणी सोडावे, असे निवेदन उत्तम लोणकर यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले आहे.
No comments:
Post a Comment